आज दिनांक १९/११/२०१८ रोजी ग्रामपंचायत किन्ही ता.जामनेर येथील सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. मावळते सरपंच श्री विनोद नाना पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.
ग्रामपंचायत किन्ही चे सरपंच पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. सकाळी १०.०० ते दु. १२.०० या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आली. दुपारी ठीक २.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय,किन्ही येथे सभा घेण्यात आली. सभेसाठी सर्वच्या सर्व म्हणजे ८ विद्यमान सदस्य हजर होते. सभेसाठी आवश्यक गणपूर्ती झाल्याने सभेस सुरुवात करण्यात आली.
सदर सरपंच निवडणूकीसाठी सदस्य सौ. पुंजाबाई गोपाल मानकर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने व ते छाननीत वैध ठरल्याने अध्यासी अधिकारी यांनी सौ. पुंजाबाई गोपाल मानकर या ग्रा.पं.किन्हीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.नवानिर्वाचित सरपंच यांचा यावेळी विद्यमान महिला सदस्य यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर सभेसाठी श्री. व्ही.एस.पाटील,मंडळ अधिकारी,फत्तेपूर भाग यांनी अध्यासी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यावेळी सदस्य- श्री. विनोद नाना पाटील,प्रभावती हिंमत पाटील,बाबुराव चिंधू उघडे,चंद्रकलाबाई विश्वनाथ सुरवाडे,दुर्गाबाई रामदास मानकर,जीवन राजाराम पाटील,प्रमोद सदाशिव काळे हे उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक श्री. ईश्वर माळी ,तलाठी श्री. शिवाजी काळे,पोलिस पाटील श्री रामजी गायके यांनी अध्यासी अधिकारी यांना सहाय्य केले. यावेळी पोलिस कर्मचारी श्री सुरवाडे व श्री. दिनेश मारवडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.